March 19, 2009

दुज्या गावच्या वाटा

इतक्यातच, थोडेथोडके नाही तर, चांगले पंधरा दिवस घरी जाऊन काही कामांनिमित्त राहणं झालं, आणि वरुन अजून बोनस दिल्यासारखे दोन -तीन दिवस मिळाले. अर्थात, घरुन ऑफिसचं काम करायचं, ही अट होतीच. पण घरी आणि माझ्या माणसांमध्ये इतके दिवस रहायला मिळणार असेल, तर अश्या कित्येक अटी अगदी हसत हसत सर ऑंखोंपर!

आणि म्हणता म्हणता पंधरा अधिक बोनस दोन, तीन दिवस संपलेदेखील. कालचा शेवटचा दिवस. उगाच एकदम इतकं वाईट वाटायला लागलं परत जायचं म्हणून, की काय सांगावं! आणि पंधरा दिवस रहा,चार दिवस रहा, की एक दिवस - ह्याने काहीच फरक नाही पडत. दर वेळी, पुण्याहून बंगलोरला परत येताना मला अगदी साता समुद्रापार चालल्यासारखं वाईट वाटतच. खरं तर इतकं कठीणही नाही बंगलोरहून पुण्याला येणं,म्हणजे पहायला गेलं तर साता समुद्रापलिकडून येणार्‍या व्यक्तीला जसं अन् जितकं प्लॅनिंग करुन वगैरे यायला लागतं, त्याच्या निम्म्यानेही त्रास नाही! पण तरीही, दर वेळी नव्यानं, परत तेवढंच दु:ख होतं. याउलट बंगलुरुहून सुटलेल्या माझ्या विमानाने (म्हणजे मी ज्या विमानात बसलेली असते ते विमान - मल्ल्या आणि इतर प्रभृती मला ही सेवा पुरवतात :D - त्यामुळे आकाशात अधिक प्रदूषण नको, ह्या विचाराने सवताचं इमान न्हाय घ्येतलं पघा! :P हेहेहे! :D ) पुण्याचा विमानतळ गाठला की मला दरवेळेस अगदी पहिल्यांदा बंगलोरहून पुण्याला आलेल्यावेळी जसा आनंद झाला होता, तस्साच आनंदही होतो! माझ्यातलं पुणं आणि क्वचित प्रसंगी पुणेरीपण मिटायला काही तयार नाही.

यावेळी ठरवलेली जास्तीत जास्त कामंही उत्तमरीत्या पार पडली. काही बाबतीत हत्तींचे कळप गेलेत आणि शेपटं राहिलीत. तशी खूप मजाही केली यावेळी पुण्यात. पुस्तकांची खरेदी (रसिक साहित्यमधून व्यवस्थित डिस्कांऊटसकट १०-१२ पुस्तकं -झिंच्याक, झिंच्याक, झिंच्याक, झिन् झिन् च्याक!! :) ), बोमलूशी ओळख अन् मग एकदम व्यवस्थित दोस्ती, रस्त्यावर मिळणार्‍या कुल्फ्या अन् बर्फाचे रंगीत गोळे खाणे (टुकटूक!), मित्रमैत्रिणींना भेटणे, शॉपिंग - म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे - मस्त पांढर्‍या रंगाची सुरेख डिझाईन्स असलेली सुती कापडं पाहणं हाही एक सुरेख अनुभव आहे, खरेदी करणं हा अजूनच सुंदर अनुभव! :D आणि हे पुरसं नाही म्हणून, नेहमीच्या शिंप्याकडून सांगितलेल्या वेळेत, कुठेही न चुकवता ते ड्रेसेस शिवून मिळणं! शिका म्हणावं बंगलोरमधल्या शिंप्यांना! अज्जिबात शिलाई जमत नाही बंगलोरी शिंप्यांना! एकतर झोळणे बनवतात, नाहीतर त्याहून काहीतरी विचित्र! कापडाची वाट लावायचं काम मात्र इमाने इतबारे करतात. असो. पुण्यातला तो शिंपी आणि बंगलोरचा तो कापडफाड्या! ;) आणि घरी पण खूप गप्पा झाल्या. एकदम मस्त वाटलं अगदी.

तर सांगायचा मुद्दा हा, की पुण्यातलं वास्तव्य सुखेनैव पार पडलं. जीव समाधानी झाला. काल मात्र परत निघायचं म्हणून जामच वाईट वाटत होतं, मलाही अन् घरच्यानांही, पण आपलं सगळेच एकमेकांना ते जाणवू नये असं "नॉर्मल" वागायला बघत होतो, प्रयत्न करत होतो. एकमेकांची अशी मनं जपण्यातही खूप समाधान आहे.

खूपश्या गोष्टी करायच्याही राहिल्या. माझ्या एक खूप लाडक्या शिक्षिका आहेत, त्यांना फोन करायचा राहिला. अजूनही काही पुस्तकं हवी होती, ती न मिळाल्याने घ्यायची राहिली. नाही मिळालीत. :( सगळ्याच मित्रमैत्रिणींना भेटता आलं नाही. घरातलीही काही कामं राहिलीत, ती आता पुढच्या वेळेला. अजून थोड्या गप्पा मारायच्या राहिल्या घरच्यांशी आणि शेजारी राहणार्‍या एक दोन काकवांशी. आहेत काकवा,पण मस्त जमतं माझं त्यांच्याशी. माझ्या फुलझाडांची जरा मशागत करायची होती, तेही राहिलच जरा धावपळीत रोजच्या.

काल रात्री झोपताना उगाच आपलं 'उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा' हे मनात घोळत राहिलं. कधीतरी झोप लागली, अन् आज पहाटे उठून परत एकदा विमानतळावर. बोमलू मुख्य फाटकापर्यंत सोडायला आला, अन् गोंधळलेल्या चेहर्‍याने तिथेच थबकला. मी आपली दुज्या गावच्या वाटा अन् वार्‍याच्या दिशेने निघाले होते.

परत एकदा ह्या दुज्या गावच्या वाटाही जुन्या आणि परिचित होतील, पण त्या शेवटी आहेत दुज्या गावच्याच.. त्या माझ्या गावच्या नाहीत!

6 comments:

Yawning Dog said...

Punvishayee vachale kee kasale mast vatate.
15 divas bakee sagale zale pan officeche kaam kele ka kharach?
:D:D

Unknown said...

pune ahe ch bhari!! :)

Shardul said...

लिहिताना शेवटी शेवटी डोळ्यांत थोडंस्सं पाणी आलं का हो तुमच्या ??
.
उगीच एक शंका म्हणून विचारलं..

यशोधरा said...

जंश्वा, केले हां काम :)
भाग्यश्री, अगदी गं, आपलं पुणं आहेच भारी!
शार्दूल, लिहितानापेक्षा पुण्यातून निघताना आलं. नेहमीच येतं.

Sneha said...

sahi vatal vachun... malahi punyala ghari jaun aalyasarakh vatal...

laich bhari ahe ga puna... :)

shatdhanva said...

'pagha' ne ekdam go ni dandekaranchi athavan karun dili.. zakas